हत्या वायफळ गेली


                🗡️"हत्या वायफळ गेली"🪓


अश्याच एका रात्री घरी परतत होतो.

चार-दोन गुंडांनी अचानक अडवलं,

चार-दोन लाथा घालत वाट्टेल तसं तुडवलं.

माझे हात तोडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.

कदाचित त्यांना माझ्या लिखाणाची भीती वाटत असावी.


पण, मी तरीही विव्हळो नाही.

माझ्या होत असलेल्या सन्मानाचा मी पुरेपूर आनंद घेत होतो.

'वाचवा', 'वाचवा' म्हणता आलं असतं, पण तरीही शांत राहिलो.

सुस्तावलेल्या दुनियेपर्यंत लेखकांचे आवाज कुठे पोहचतात म्हणा आजकाल ,या विचाराने.

 

हात सोडले गुंडांनी आणि पिस्तुल काढली. ज्या हाताने मी माझी कलम चालवायचो ते हात तोडता आले नसावेत त्यांना कदाचित.

 

 पिस्तुलीतल्या गोळ्यांनी माझ्या उभ्या देहाची चाळन करून ते निघून गेले. त्यांनी त्यांचं काम चोख बजावलं होतं. पण एक चूक वगळता , माझं सांडलेलं रक्त त्यांनी पुसून टाकलं नाही आणि त्यांच्या याच चुकीमुळे त्यांना नको असणारी वैचारिक क्रांती पुन्हा जन्मास आली. 


त्यामुळे त्यांनी माझी केलेली हत्या अगदी वायफळ गेली  ........... 

=======================

कवी: ©️®️ प्रतिक_कांबळे

               (कविराज)



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पायी रुतल्या काट्यात ये